
भाई भाऊसाहेब राऊत
भारतीय कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य थोर नेते म्हणजे राजाराम बाळकृष्ण उर्फ भाऊसाहेब राऊत हे होत . मुंबईमध्ये परंपरागत ऐश्वर्य संपन्न अशी जी मोजकी घराणी होती त्यातील गिरगावातील राऊत घराणे होय.अशा या धनसंपन्न कुटुंबात १९ फेब्रुवारी १९०४ रोजी भाऊसाहेबांचा जन्म झाला. घरातील सुसंस्कृत वातावरणात आणि करडी शिस्त यात भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. जीवनात सुख असतानासुद्धा ते त्यामध्ये रमले नाहीत. त्यांनी आपले जीवन समाजोद्धार व क्रांतिकारी राजकारणात झोकून दिले . १९३५ मध्ये भाऊसाहेबांनी माथेरान ( कर्जत ) येथे एक छोटा बंगला विकत घेतला. तेथे ते अधूनमधून सहकुटुंब जात असत. माथेरानमध्ये त्यावेळी मुंबईतील श्रीमंत पारशांचे वर्चस्व होते . येथील नगरपालिकासुद्धा पारशांच्या हाती होती . भाऊसाहेबना हे शल्य सारखे टोचत होते. भाऊसाहेबांना येथील गरीब, आदिवासी, मागासलेल्या समाजाबद्दल सहानुभूती निर्माण झाली. त्यातून त्यांनी अशा भूमीपुत्राची एक भक्कम संघटना उभारली . १९४२ च्या आंदोलनातील भाई कोतवाल, गोपाळराव शिंदे सारखे तरूण निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले. अशातूनच त्यांनी पारशींच्या ताब्यात असलेली नगरपालिका सन १९३८ मध्ये भूमीपुत्रांच्या ताब्यात आणली. गोपाळराव शिंदे या माळी समाजातील कार्यकर्त्याला त्यांनी येथे नगराध्यक्ष म्हणून नियुक्त केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे कार्य उल्लेखनीय स्वरूपाचे आहे .
- शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ
- व्हिएन्ना येथील परिषदेत सहभाग
- सन १९६७ च्या लोकसभा निवडणूकीतील भूमिका