अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आक्रमक : अन्यायकारक कृषी विधेयके रद्द करण्यासाठी केला चक्काजाम

कोल्हापूर/पुणे (६ नोव्हेंबर) : केंद्र सरकारने  बहुमताच्या जोरावर    संमत केलेले कृषी विधेेयक शेतकरी व कामगार विरोधी असून पारंपारिक कृषी अर्थव्यवस्था  उध्वस्त करणारे आहेत हे कायदे रद्द करावेत  या  मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी कोल्हापूर, पुण्यासह विविध ठिकाणी रास्ता रोको,चक्काजाम, निदर्शने करण्यात आले. कोल्हापुर-राधानगरी मार्गावर हळदी ता.करवीर येथील शिवाजी चौकात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या देशव्यापी    चक्काजाम आंदोलन करून सुमारे एक तास वाहतुक रोखुन धरली. यावेळी मोदी  सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा माजी आमदार भाई संपत बापू पवार म्हणाले, नवीन…

म्हाळुंगे ता. करवीर येथे वर्धापनदिन मोठ्या उत्साहात

कोल्हापूर- म्हाळुंगे ता. करवीर येथे शेतकरी कामगार पक्षाचा 73 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित श्री. के . बी. पाटील, बाबासाहेब देवकर,सरदार पाटील,अमित कांबळे,तुकाराम खराडे, एम डी निचिते, आंनदा मोरे,म्हाळुंगे गावातील पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते होते,यावेळी पक्षाची ध्येयधोरणे,विचार,व भविष्यात करावयाची वाटचाल या विषयी चर्चा मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली,तसेच कोरोनाच्या लॉकडाऊन काळात आलेली घरगुती वीज बिल माफ करणेसाठी,दुधदर वाढीसाठी शासनाला ,त्या त्या विभागाला पत्रव्यवहार अथवा मोबाईल द्वारे एस एम एस प्रत्येक कार्यकर्त्याने करनेचे ठरवण्यात आले,प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला .