
आंबिल ओढ्याच्या अन्यायग्रस्तांना न्याय मिळाल्याशिवाय शेकाप स्वस्थ बसणार नाही
शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड.राजेंद्र कोरडे यांची ग्वाही
पुणे (८ जुलै) : बिल्डर, राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी मिळून आंबिल ओढ्याच्या भुखंडाचे श्रीखंड खाण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा अन्यायकारक प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष हाणून पाडणार असून स्थानिक रहिवासी आणि मुखमंत्री उध्दव ठाकरे यांची लवकरच भेट घडवून आणून चर्चा केली जावून आंबिल ओढ्याचा प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड.राजेंद्र कोरडे यांनी दिले.
पुण्यातील आंबिल ओढा येथे झालेल्या चुकीच्या व अन्यायकारक पद्धतीने झालेल्या कारवाई संबंधाने शेतकरी कामगार पक्षातर्फे कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे यांनी अन्यायग्रस्त आंबिल ओढ्याच्या नागरिकांची भेट देऊन चर्चा केली. व माहिती जाणून घेतली.
बिल्डरच्या हितासाठी पुणे महानगरपालिकेकडून ही चुकीची कारवाई करुन नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरातून बेघर करण्यात आले, अशी टिकाही भाई ॲड.राजेंद्र कोरडे यांनी केली.
बेघर झालेल्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळाल्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शेतकरी कामगार पक्षातर्फे ॲड.राजेंद्र कोरडे यांनी अन्यायग्रस्त नागरिकांना देण्यात आली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष भाई सागर आल्हाट,भाई सागर पवार,शेकाप पुणे टिम उपस्थित होती.