मासेमारी नौकांना मासे विक्रीच्या परवानगीचे आदेश द्या : शेतकरी कामगार पक्षाची अदिती तटकरे यांच्याकडे मागणी

  पनवेल (२९ सप्टेंबर): कोविड 19 चा प्रादुर्भाव तसेच मच्छिमारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी करंजा संस्थेने सादर केलेल्या यादीतील १०० मासेमारी नौकांना तात्पुरत्या स्वरूपात / कालावधीत त्यांच्या करंजा बंदर येथे मासे विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, विधान परिषदेचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी उद्योग,खनिकर्म,पर्यटन, फलोत्पादन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार भाई बाळाराम पाटील यांनी अदिती तटकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रायगड जिल्हयातील करंजा संस्थेच्या यादीतील नमूद मासेमारी नौका मुंबई शहर जिल्हयात कार्यरत असून नविन भाऊचा धक्का व ससून डॉक बंदरातील वर्तमान…

शासनाने खरेदी केलेल्या मक्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी : शेतकरी कामगार पक्षाची छगन भुजबळ यांचेकडे मागणी

  शासनाने खरेदी केलेल्या मक्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी : शेतकरी कामगार पक्षाची छगन भुजबळ यांचेकडे मागणी गडचिरोली (२९ सप्टेंबर) : केंद्र सरकारच्या NeML चे पोर्टल वर लाॅट एन्ट्री न झाल्याचे कारण देवून शासनाने खरेदी केलेला मका व ज्वारी शेतकऱ्यांना परत न करता सदर भरडधान्याच्या बिलाची रक्कम तातडीने अदा करुन संबंधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचेकडे केली आहे. राज्यभरातील स्थानिक खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या पत्रानुसार हजारो शेतकऱ्यांना, आपण विकलेल्या…

अन्यायकारक कृषी विधेयके देशात कुठेही लागू करु नका : शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रपतींना विनंती

  अन्यायकारक कृषी विधेयके देशात कुठेही लागू करु नका : शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रपतींना विनंती गडचिरोली (२५ सप्टेंबर): कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल, आवश्यक वस्तू कायद्यात बदल आणि कंत्राटी शेती अशी तीन कृषीविरोधी विधेयके केंद्र सरकारने नुकतीच संख्याबळावर रेटून बेकायदेशीरपणे संसदीय कार्यपद्धतीचे सर्व संकेत व नियम पायदळी तुडवून पास करून घेतलेली आहेत. सदरचे घटनाबाह्य, शेतकरीविरोधी कृषी विधेयके देशात कुठेही लागू करण्यात येवू नये, अशी विनंती भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे राष्ट्रपतींना करण्यात आली. आज देशभरातील २६० राजकीय ,शेतकरी, शेतमजूर संघटना एकत्र येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या मार्फत सदरच्या अन्यायकारक विधेयकांवर माननीय राष्ट्रपती यांनी…

मंत्र्यांच्या नावाने राज्यव्यापी पैसे वसुली प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावरुन तपास करावा अन्यथा आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा: शेतकरी कामगार पक्षाची मागणी

गडचिरोली (२० सप्टेंबर): राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या नावाने प्रत्येकी एक लाख रुपये जमा केल्याप्रकरणी आरमोरी पोलीसांनी 9 लाख रुपये जप्ती केल्याच्या प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात असल्याने वरीष्ठ स्तरावरुन चौकशी करुन आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांच्या नावे वसुली करणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी,अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई रामदास जराते यांनी केली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना भाई रामदास जराते यांनी म्हटले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ आणि सेवेत कायम करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे राज्याचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालक यांना…

डिस्टीलरी प्रकल्पासाठी घेतलेले पैसे शेतकऱ्यांना परत करा: अन्यथा राज्यभर आंदोलन

डिस्टीलरी प्रकल्पासाठी घेतलेले पैसे शेतकऱ्यांना परत करा: अन्यथा राज्यभर आंदोलन साखर आयुक्तांना शेतकरी कामगार पक्षाचा इशारा पुणे: इंदापूर तालुक्यातील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पासाठी प्रति टन ५० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांकडून घेतलेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ परत करण्यात यावेत अन्यथा महोदय याप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी साखर आयुक्तांना दिला आहे. पुण्याच्या शिवाजीनगरस्थित साखर आयुक्तांना लिहिलेल्या निवेदनात भाई राहुल पोकळे यांनी म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मौजे तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांचा ऊस सन २००८ –…

श्रीमती मीनाक्षीताई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीमती मीनाक्षीताई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विधानसभा सभागृहात अभ्यासू, परखड, बेधडक, स्पष्ट आणि सत्य मांडण्याची सातत्याने भूमिका राबवणारी रणरागिणी म्हणून त्यांच्या कार्यकाळात सर्वांनी ज्यांचे कौतुक केलं त्या रायगडच्या लेकीचा अर्थात श्रीमती मीनाक्षीताई पाटील यांचा आज वाढदिवस. शेकापची मुलूख मैदान तोफ असलेल्या ताईना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

वैनगंगेच्या कृत्रिम महापूराने बाधितांना प्रत्यक्ष नुकसानीची सरकारने भरपाई द्यावी: शेतकरी कामगार पक्षाची केंद्रीय पथकाकडे मागणी

  वैनगंगेच्या कृत्रिम महापूराने बाधितांना प्रत्यक्ष नुकसानीची सरकारने भरपाई द्यावी: शेतकरी कामगार पक्षाची केंद्रीय पथकाकडे मागणी पीकनिहाय पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला देण्याचे केंद्रीय पथकाने दिले आश्वासन गडचिरोली: वैनगंगा नदीला आलेल्या महापूरास गोसेखुर्द धरणाचे प्रशासन आणि महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारचे आपसात नसलेले समन्वय जबाबदार आहे.त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टीने या कृत्रिम महापूराची जबाबदारी सरकारने घेवून याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी आणि नैसर्गिक आपत्तीचे निकषांऐवजी प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पीक निहाय भरपाई करुन द्यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाने केंद्रीय पथकाकडे केलेली आहे. गडचिरोली येथील स्थानिक सर्कीट हाऊस येथे काल शनिवारी सायंकाळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ…

मालेगावात शेकापचा रास्ता रोको: वाहतूक ठप्प

राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मालेगाव : मालेगाव येथून जाणाऱ्या कल्याण ते निर्मल या २२२ महा मार्गाचे चौदपदरी करणाचे काम पाटील कन्स्ट्रक्शन या कंपनी कडून होत असून या निकृष्ट दर्जाच्या कामाची गुणवत्ता तपासून कंत्राटदारांविरूद्ध व रस्त्याच्या कामावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मालेगाव येथील महामार्गावर शेकापचे जिल्हा चिटणीस भाई शुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मालेगाव येथून २२२ या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक…

वाढीव विद्युत बिले माफ करा: अन्यथा आंदोलन – शेकापचा इशारा

वाढीव विद्युत बिले माफ करा: अन्यथा आंदोलन – शेकापचा इशारा अलिबाग : लॉकडावूनमुळे आधीच आर्थिक संकटात असताना निसर्ग चक्रीवादळाने उध्वस्त झालेल्या रायगडकरांना महावितरणने शॉक देत वाढीव तसेच सरासरी बिल दिल्याने जनता त्रस्त आहे. त्यामुळे वाढीव बिलं रद्द करून ३०० युनिट पर्यंतची सर्व वीजबिले माफ करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत शेतकरी कामगार पक्षाने महावितरणला अल्टिमेटम दिला आहे. शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेकापक्षाच्या शिष्टमंडळाने आज महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजित पिंगळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी तालुका चिटणीस अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील, अनिल…

कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

  कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी गडचिरोली: राज्यभरात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत साधारणपणे २२,००० कर्मचारी कंत्राटी तत्वावर मागील १० ते १५ वर्षापासून कार्यरत आहेत. सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने समायोजन करुन सेवेत कायमस्वरुपी करावे,अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केली आहे. भाई रामदास जराते यांनी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्याप सदर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले नाही किंवा मानधनातही विशेष वाढ केलेली नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग…