मागील वर्षी एफआरपी पेक्षा ऊसाला कमी दर देऊन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना फसवले – भाई मोहन गुंड

एफ आर पी प्रमाणे ऊस बील द्या शेकापची साखर आयुक्तांकडे तक्रार बीड (७नोव्हेंबर): बीड जिल्ह्यामध्ये जवळपास डझनभर साखर कारखाने असून बीड जिल्ह्याला लागून असलेले शेजारील जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांनी देखील मागील वर्षाच्या ठरवुन दिलेल्या एफ आर पी प्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिल दिले नसल्याची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. मागील वर्षी ऊस हागामात कारखान दाराकडुन शेतकऱ्यांना एफ आर पी प्रमाणे ऊस बील देऊ इतर कारखान्याच्या तुलनेत शंभर रुपयांचा हप्ता अधिक देऊ असे खोटे आश्वासन जिल्ह्यातील कारखान्याच्या चेअरमनी मोठ मोठ्या गप्पा मारल्या पण बील मात्र देत असताना जिल्ह्यातील कुठल्याच कारखान्यांनी एफआर…

आमदार भाई बाळाराम पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : अखेर विद्यार्थी, शिक्षकांना १४ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

मुंबई (७ नोव्हेंबर) : कोरोना संक्रमणाच्या पार्श्र्वभूमीवर सलग सात महिन्यांपासून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत, शालेय कामकाजात गुंतलेल्या विद्यार्थी, शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानसिक आराम मिळावा यासाठी दिवाळीची सुट्टी पुर्वीप्रमाणेच जाहीर करण्यात यावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालेले असून शासनाला १४ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करावी लागली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, एप्रिल महिन्यापासून सलग ७ महिने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी…

विद्यार्थी, शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच १८ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करा : आमदार भाई बाळाराम पाटील यांची मागणी

मुंबई (६ नोव्हेंबर): कोरोना संक्रमण काळ असुनही , वाहतुकीची पर्याप्त साधने उपलब्ध नसतानाही प्रत्यक्ष शाळा – कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आवश्यक शालेय कामकाज करीत असलेल्या आणि सलग ७ महिन्यापासून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत , शालेय कामकाजात गुंतलेल्या विद्यार्थी , शिक्षकांना , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानसिक आराम म्हणून दिवाळीची सुट्टी जाहीर करा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात ज्ञआमदार भाई बाळाराम पाटील यांनी म्हटले आहे की, एप्रिल महिन्यापासून सलग ७ महिने…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने राबवा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांचे निवडणूक आयोगाला पत्र मुंबई (६ नोव्हेंबर): कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्थितीत स्थगिती दिलेल्या आदेशाला झालेला दिर्घ काळ लक्षात घेऊन व नव्याने उमेदवारीस इच्छुकांची संधी हिरावली जावू नये यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया नव्याने व जलद गतीने राबविण्यात यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाई जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,महानगर पालिका, नवी मुंबई, औरंगाबाद व वसई विरार , ९ नगर परिषद – नगर पंचायती व पोटनिवडणुका, जिल्हा परिषदा व…

रंगभूमीतील बॅकस्टेज कामगारांना ५० हजारांची मदत करा : अमित देशमुख यांचेकडे शेतकरी कामगार पक्षाची मागणी

शेकापच्या शिष्टमंडळाने केली चर्चा : मंत्र्यांनी दिले मदत करण्याचे आश्वासन मुंबई (२ नोव्हेंबर) : कोविड -१९ च्या लॉकडाऊन मुळे मुंबई सह राज्यातील सर्व नाट्यगृहे बंद असून नाटकांच्या सादरीकरणावरही बंदी आहे . परिणामी रंगभूमीवरील बॅकस्टेज कामगाराचा रोजगार बुडाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने रंगभूमीतील बॅकस्टेज कामगारांना शासनाने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षातर्फे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमीत देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षातर्फे पक्षाचे कार्यालयीन चिटणीस भाई ॲड.राजेंद्र कोरडे, राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई शैलेंद्र मेहता,भाई रामदास जराते,रायगड शेकापच्या महिला नेत्या चित्रलेखा पाटील, ठाणे शहर चिटणीस भाई अनिल…

डॉ.आ.ह. साळुंखे यांना “महाराष्ट्र भूषण” सन्मान मिळण्याकरीता पाठपुरावा करणार : आमदार भाई जयंत पाटील

डॉ.आ.ह. साळुंखे यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार : आमदार भाई जयंत पाटील भाई राहुल पोकळेंच्या मागणीची घेतली दखल पुणे ( २८ ऑक्टोबर) : डॉ.आ.ह. साळुंखे हे साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आजपर्यंत त्यांनी साधारण ५५ पुस्तके लिहीलेली आहे व त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पुस्तके लिहीली पीएचडी मिळवलेली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना शासनाचा “महाराष्ट्र भूषण” हा सन्मान मिळावा यासाठी आपण पुरेपूर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील यांनी दिले. भाई जयंत पाटील पुणे येथे आले असता, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे…

कोट्यवधींच्या निधी मंजूरी नंतरही नळयोजना कशी काय रखडली ?

शेकाप नेते, माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांचा सवाल रोहा, रायगड (२८ ऑक्टोबर): धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यामुळे कुंडलिकेच्या दोन्ही तीरावरील गावांचे पाण्याचे स्रोत दूषित झाल्याने २६ गावातील नागरिकांसाठी नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचावे यासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भाई पंडित पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच निधी मंजूर करूनदेखील अद्याप कामाला सुरुवात का नाही, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार भाई पंडीत पाटील यांनी उपस्थित केला असून येत्या १५ दिवसात सदर कामाला सुरुवात झाली नाही…

कापूस खरेदी तात्काळ सुरू करा : अन्यथा शेकाप जिल्हाभरात तीव्र आंदोलन करणार

कापूस खरेदी तात्काळ सुरू करा : अन्यथा शेकाप जिल्हाभरात तीव्र आंदोलन करणार भाई ॲड.नारायण गोरे यांचा इशारा माजलगाव,बीड ( २७ ऑक्टोबर): परतीच्या पावसाने निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झालेला असून थोडाफार शिल्लक राहिलेला कापूस विक्री करण्यासाठी शासनाची कोणतीही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने, शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत असून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लूट करीत आहेत.त्यामुळे शासनाने तात्काळ शासकीय कापूस खरेदी सुरू करावी,अन्यथा शेतकरी कामगार पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती सदस्य भाई ॲड. नारायण गोले पाटील यांनी दिले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माजलगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बोंब मारो आंदोलन : शेतकरी कामगार पक्ष आक्रमक

दुष्काळासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बोंबमारो आंदोलन शेतकरी कामगार पक्ष आक्रमक : प्रशासनाचा केला निषेध बीड (२३ ऑक्टोबर):- बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या, मागील वर्षाचे एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना बिल वाटप करा कापसाला आठ हजार रुपये भाव द्या, डीसीसी बँक एकदिन प्रलंबित पिक कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करा, बीड जिल्ह्यामध्ये सरसकट पिक विमा लागू करा यासह शेतकऱ्याच्या इतर हे प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेकापचे भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व बोंब मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार बोंममारो…

शासनाने खरेदी केलेल्या मक्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी : शेतकरी कामगार पक्षाची छगन भुजबळ यांचेकडे मागणी

  शासनाने खरेदी केलेल्या मक्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी : शेतकरी कामगार पक्षाची छगन भुजबळ यांचेकडे मागणी गडचिरोली (२९ सप्टेंबर) : केंद्र सरकारच्या NeML चे पोर्टल वर लाॅट एन्ट्री न झाल्याचे कारण देवून शासनाने खरेदी केलेला मका व ज्वारी शेतकऱ्यांना परत न करता सदर भरडधान्याच्या बिलाची रक्कम तातडीने अदा करुन संबंधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचेकडे केली आहे. राज्यभरातील स्थानिक खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या पत्रानुसार हजारो शेतकऱ्यांना, आपण विकलेल्या…