भाजीपाल्यासह फळाचे बीट चालू न केल्यास शेकाप आसुड आंदोलन करणार

कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्यासह फळांची खरेदी करावी : भाई अँड.नारायण गोले पाटील यांची मागणी माजलगाव ( प्रतिनिधी ) : मराठवाड्यातील नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकीक देखील आहे. या वर्षी माजलगाव तालुक्यातील शेतकन्यांनी भाजीपाला,फळे ( मेथी चुका पालक,गोबी वांगे कांदे.लसुन,कोथींबीर, भेंडी,गवार,कारले, दोडके व टरबुज पपई मोसंबी.लींबु,खरबुज ) आदींची प्रचंड प्रमाणात लागवड केलेली असुन त्यास लाखो रुपये खर्च करुन भाजीपाला व फळे पिकवले आहेत, परंतु माजलगाव बाजार समीती केवळ शेतकऱ्यांची सोयाबीन तुर बाजरी,गहु ,ज्वारी हरभरे हे कडधान्ये खरेदी करुन उर्वरीत पिकांना खरेदी करण्यास जाणीवपुर्वक टाळत आहेत.सदरची खरेदी तात्काळ सुरू…

स्वाभिमानीच्या सचिन अरुण शिंदे यांना शेकापचा पाठिंबा

पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणूकीतून महाराष्ट्रात स्वतंत्र पुरोगामी पर्याय मजबूत करणार सोलापूर (९ एप्रिल): पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीतून महाराष्ट्रात स्वतंत्र पुरोगामी पर्याय मजबूत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनातील सक्रीय कार्यकर्ते सचिन अरुण शिंदे यांना शेतकरी कामगार पक्षातर्फे आज भक्कम पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि भाई गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्रात स्वतंत्र पुरोगामी पर्याय मजबूत होण्यासाठी हा पाठिंबा स्वाभिमानीच्या सचिन शिंदे यांना जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत राहुन भांडवलदारधार्जिण्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षासह स्वाभीमानी शेतकरी संघटना व इतर पक्षांनी प्रयत्नांची पराकाष्ठा…

पुण्यातील परिस्थिती भयावह : अजित पवारांनी राजीनामा द्यावा

खजिनदार भाई राहुल पोकळे यांची मागणी पुणे (९ एप्रिल) : पुणे जिल्ह्यात कोविड १९ विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखांवर पोहचलेली असून संपूर्ण जिल्हाभरात कोणत्याही ठिकाणी रुग्णांकरीता बेड उपलब्ध नाहीत.ही परिस्थिती भयावह असून याला जबाबदार सत्ताधारी असून जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पुण्याचे महापौर मुर्लिधर मोहोळ यांनी या नाकर्तेपणा करीता तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी केली आहे. भाई राहुल पोकळे यांनी म्हटले आहे की, राज्यातील आघाडी सरकारने दुर्लक्ष तर केंद्रातील मोदी सरकारने सापत्न पणाची वागणूक दिल्याने पुणे शहरासह जिल्ह्यात…

शेतकर्‍यांनो महावितरणची वीजबिले भरू नका : शेतकरी कामगार पक्षाचे आवाहन

गडचिरोली (१८ फेब्रुवारी): राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारने वीजबिल वसूलीची सुरू केलेली मोहीम पुर्णतः चुकीची आणि बेकायदेशीर असून राज्यातील शेतकऱ्यांनी महावितरणने पाठविलेल्या अव्वाच्या सव्वा वीजबिलांची रक्कम भरु नये, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षातर्फे करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, सन २००८ पासून राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या वीजबिलापोटी २/३ रक्कम अनुदान स्वरूपात द्यायचे मान्य केले होते आणि त्यानुसार शासनाने ती अनुदानाची रक्कम महावितरणकडे जमा सुद्धा केली. सदर अनुदान रक्कम ही २/३ म्हणजे चोवीस तास वीज वापर गृहीत धरून त्यापैकी सोळा तासांचा हिशेब लावून दिली गेली आहे. याशिवाय शेतकर्‍यांनी उर्वरित १/३ म्हणजे आठ तासांच्या…

नुकसान भरपाई टाळण्यासाठी प्रशासनाने केली बोगस आणेवारी जाहीर : शेतकरी कामगार पक्षाचा आरोप

गडचिरोली (३० डिसेंबर) : २०२०-२१ या वर्षाची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली असून, जिल्ह्यातील उत्पन्नाची सरासरी पैसेवारी ०.६३ एवढी आहे. सुमारे १३३७ गावांची पैसेवारी ५० पैशाहून अधिक आहे,असे जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केलेले असून महापूर आणि मावा,करपा, तुडतुडा यासारख्या रोगांनी धान पीकांना जबरी फटका बसून शेतकऱ्यांची मोठी नुकसान झालेली असतांनाही ५० पैशांपेक्षा अधिकची आणेवारी जाहीर करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नागविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केला आहे. भाई रामदास जराते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात…

८ डिसेंबरचा भारत बंद उत्स्फूर्तपणे यशस्वी करा : भाई जयंत पाटील यांचे आवाहन

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचा शेकापचा भक्कम निर्धार मुंबई (६ डिसेंबर): केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीत घेराव आंदोलन सुरू आहे. सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकरी शिष्टमंडळांसोबतच्या अद्यापपर्यंतच्या सर्व बैठका व वाटाघाटी निष्फळ ठरल्या आहेत. या आंदोलनकारी शेतकऱ्यांनी सरकारच्या अनास्थेविरोधात ८ डिसेंबर २०२० रोजी ‘भारत बंद’ची हाक दिलेली असल्याने राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार आणि सामान्य जनतेने हा ‘भारत बंद’ यशस्वी करावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केले आहे. भाई जयंत पाटील यांनी म्हटले आहे की,केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल, आवश्यक…

अन्यायकारक कृषी विधेयके राज्यात लागू करु नका: आमदार भाई जयंत पाटील

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षातर्फे मागणी मुंबई (३ डिसेंबर): मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कोणतीही चर्चा न करता तीन शेती आणि चार कामगार विरोधी विधेयके संसदीय संकेतांची पायमल्ली करून बळजबरी पारीत केले आहेत.त्याला देशभरातील शेतकरी आणि कामगार कडाडून विरोध करीत आहेत.त्यामुळे राज्य सरकारने ही विधेयके राज्यात लागू करु नये, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात झालेल्या बैठकीत आमदार भाई जयंत पाटील यांनी ही मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. विधानभवन परिसरात पत्रकारांशी याबाबत बोलतांना आमदार भाई…

कोरोना काळातील वीज बील माफ करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन पुणे ( २० नोव्हेंबर) : वीज बीलावरुन राजकारण करण्यापेक्षा कोरोना काळातील वीज बील माफ करण्याची कार्यवाही करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या पुणे शहर शाखेतर्फे करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या पुणे शहर शाखेच्या वतीने शहर चिटणीस भाई सागर आल्हाट यांच्या नेतृत्वात महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महावितरण महामंडळ ची आर्थिक स्थिती ठिक नसेल पण कोवीड १९ मुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचेही कंबरडे मोडले आहे, लोकांचा रोजगार गेला आहे, सामान्य जनतेची बचत ही संपली असल्याने भयानक आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा…

शेतकरी कामगार पक्षाच्या मागणीला यश : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने जाहीर होणार

नव्या मतदारांना मतदान आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा मुंबई (१९ नोव्हेंबर): कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्थितीत स्थगिती दिलेल्या आदेशाला झालेला दिर्घ काळ लक्षात घेऊन व नव्याने उमेदवारीस आणि मतदानास इच्छुकांची संधी हिरावली जावू नये यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया नव्याने व जलद गतीने राबविण्यात यावी या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीला यश मिळाले असून राज्य निवडणूक आयोगाने आहे त्या टप्प्यावर तात्पूरती स्थगित केलेली सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची आज घोषणा केलेली आहे. भाई जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहिलेल्या…

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेकापने केले शेतशिवारात आंदोलन

माजलगाव, बीड (१६ नोव्हेंबर): माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतशिवारावर बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून ठेचा भाकरी खाऊन, तुमची दिवाळी आमचा शिमगा अशा घोषणा देवून शेतकरी कामगार पक्षातर्फे ठेचा भाकरी आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समीतीचे सदस्य भाई ॲड.नारायण गोले पाटील यांनी तहसील प्रशासनाला निवेदन दिले होते.मात्र तहसील प्रशासनाने तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यास व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दखल घेतल्यास नकार दिलेला होता. मात्र शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ठाम असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्यानंतरही भाई अँड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन बांधावर करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,…